IND vs SA Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जूनमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जूनमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर, दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारताचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी ठिकाण जाहीर केले आहे. त्यानुसार हे पाचही सामने कटक, विशाखापट्टणम (Visakhapatnam), दिल्ली, राजकोट आणि चेन्नईमध्ये होणार आहेत. (Before the World Cup, there will be a five-match T20 series between Team India and South Africa)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने 2 मार्च रोजी झालेल्या शिखर परिषदेच्या बैठकीत या मालिकेची माहिती देताना, त्यासाठी ठिकाणांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, बीसीसीआयच्या वेबसाइटवरुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ही मालिका 9 जूनपासून सुरु होणार असून पाचवा आणि शेवटचा सामना 19 जून रोजी होणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी होणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांना त्यांच्या तयारीची चाचणी घेण्याची ही संधी असेल.

तसेच, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सलग तीन T20 मालिका क्लीन स्वीप करुन ICC क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आतापर्यंत 12 सामने जिंकले आहेत.

शिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला होता, तर कसोटीत 1-2 ने मालिका गमावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT