Rishabh Pant In Test Cricket 
क्रीडा

Rishabh Pant: अर्रे आवाज कुणाचा...! धोनीच्या निवृत्तीनंतर एकट्या पंतने केल्या 6 यष्टीरक्षकांपेक्षा जास्त धावा

MS Dhoni: धोनीच्या निवृत्तीनंतर आतापर्यंत भारताने कसोटीत सात यष्टीरक्षक फलंदाजांना आजमावले आहे, परंतु पंत वगळता एकाही यष्टीरक्षकाला फलंदाजीत चमत्कार करता आलेला नाही.

Ashutosh Masgaunde

After MS Dhoni's retirement, Rishabh Pant alone has scored more runs than any other 6 wicketkeepers for India:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी टीम इंडियाने जिंकली.

आता तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तथापि, टीम इंडियासाठी आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये एक गोष्ट खटकणारी आहे ती म्हणजे यष्टीरक्षक केएस भरतला बॅटने कोणतीही जादू दाखवता न येणे. भरतने यष्टिरक्षणात दमदार कामगिरी करत आहे, पण फलंदाजीत तो काही विशेष करू शकला नाही.

यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याला अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि अश्विननंतर फलंदाजीसाठी उतरवले होते.

जोपर्यंत महेंद्रसिंग धोनी किंवा ऋषभ पंत संघात होते, तोपर्यंत यष्टीरक्षक फलंदाजापेक्षा कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला प्राधान्य दिल्याचे क्वचितच दिसले. यावरून कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला भरतवर फलंदाज म्हणून फारसा विश्वास नसल्याचे सिद्ध होते. भरतने इंग्लंडविरुद्ध चार डावात फक्त ९२ धावा केल्या आहेत.

भरतने आतापर्यंत सात कसोटी सामने खेळले असून 12 कसोटी डावात त्याला केवळ 221 धावा करता आल्या आहेत.

केवळ भारतच नाही तर धोनीच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 2015 पासून आतापर्यंत भारताने कसोटीत सात यष्टीरक्षक फलंदाजांना आजमावले आहे, परंतु पंत वगळता एकाही यष्टीरक्षकाला फलंदाजीत चमत्कार करता आलेला नाही.

2015 पासून आतापर्यंत पंतने जितक्या धावा केल्या आहेत तितक्या धावा इतर 6 यष्टीरक्षक फलंदाजांना करता आलेल्या नाहीत.

भारतीय संघ व्यवस्थापनाने 2015 पासून कसोटी संघात ज्या सात यष्टिरक्षकांना आजमावले त्यामध्ये पंत, केएल राहुल, रिद्धिमान साहा, केएस भरत, पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक आणि इशान किशन यांचा समावेश आहे.

पंतने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने 56 कसोटी डावांमध्ये 43.7 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट ७३.६ होता. त्याचबरोबर त्याने 11 अर्धशतके आणि पाच शतके झळकावली.

उर्वरित सहा यष्टीरक्षकांनी मिळून गेल्या नऊ वर्षांत (2015 पासून) 83 डावांत 28.8 च्या सरासरीने 1985 धावा केल्या आहेत. या काळात त्यांचा स्ट्राईक रेट ४९.९ होता. त्याच वेळी, त्या सहा फलंदाजांनी नऊ अर्धशतके आणि चार शतके झळकावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Solo Travel Destinations: गोवा, मुंबई... सोलो ट्रॅव्हलर्ससाठी 'बेस्ट' 7 ठिकाणं! महिलांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आहेत 'ही' पर्यटन स्थळं

Goa Tour Package: बजेटमध्ये गोव्याची सफर! 15 हजारांत खाण्या-पिण्याची अन् राहण्याची सोय; 'IRCTC'नं आणलंय खास टूर पॅकेज

IRIS Dena Attack: "पप्पा! अमेरिकेनं अल्टिमेटम दिलाय...'' इराणी युद्धनौकेवरील हल्ल्यापूर्वी नाविकाचा शेवटचा तो फोन; कमांडर-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली होती खडाजंगी

Grah Gochar March 2026: "पैसा, प्रमोशन आणि प्रेमाची त्रिवेणी युती''! मार्च महिन्यात सूर्य-शुक्राचे महागोचर; 'या' राशींच्या आयुष्यात लवकरच सुखाचे दिवस

Goa Drugs Case: 'गांजा' तस्करीचा प्रयत्न उधळला! आसामच्या तरूणाला सिकेरीतून बेड्या, कळंगुट पोलिसांची मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT