Abhishek Sharma T20I Record Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Abhishek Sharma T20I Record: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत तब्बल 90 धावांनी विजय मिळवला आणि मालिकाही आपल्या नावावर केली.

Sameer Amunekar

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत तब्बल 90 धावांनी विजय मिळवला आणि मालिकाही आपल्या नावावर केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 219 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेला 17.5 षटकांत अवघ्या 129 धावांत गुंडाळले. या सामन्यात ईशान किशनला 44 चेंडूत 81 धावांची स्फोटक खेळी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला, मात्र अभिषेक शर्माने आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला.

गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अभिषेक शर्मा यावेळी चेंडू हातात घेतल्यानंतर चमकला. त्याने 2.5 षटकांत केवळ 17 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांची संधीच मिळाली नाही.

या कामगिरीमुळे अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात तीन बळी घेणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही सलामीच्या फलंदाजाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी करता आली नव्हती.

फलंदाजीत अपेक्षित यश नाही

गोलंदाजीत ऐतिहासिक विक्रम केला असला, तरी या मालिकेत अभिषेकची फलंदाजी अद्याप अपेक्षेनुसार झालेली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात तो अवघी 1 धाव करून बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो केवळ 8 धावांवर माघारी परतला.

त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना अभिषेकसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. गोलंदाजीत आत्मविश्वास मिळाल्यानंतर आता तो फलंदाजीतही मोठी खेळी करून टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.

ईशान आणि तिलकची दमदार फलंदाजी

भारतीय डावात ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 81 धावांची खेळी साकारली, तर उपकर्णधार तिलक वर्माने 29 चेंडूत नाबाद 60 धावा करत संघाला 219 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव लवकरच कोसळला.

गोलंदाजांची प्रभावी कामगिरी

अभिषेक शर्माच्या तीन बळींशिवाय यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवले. तसेच रवि बिश्नोई, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत भारताचा विजय अधिक भक्कम केला.

भारताने मालिका आधीच जिंकली असली, तरी आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या टी-20 सामन्याकडे लागले आहे. गोलंदाजीत इतिहास रचलेल्या अभिषेक शर्माकडून आता फलंदाजीतही मोठ्या खेळीची क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

वेर्ण्यात भीषण दुर्घटना! धावत्या मिनी टेम्पोवर कोसळली उच्चदाब वीजवाहिनी; 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

SCROLL FOR NEXT