Abhishek Sharma T20I Record Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Abhishek Sharma T20I Record: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत तब्बल 90 धावांनी विजय मिळवला आणि मालिकाही आपल्या नावावर केली.

Sameer Amunekar

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत तब्बल 90 धावांनी विजय मिळवला आणि मालिकाही आपल्या नावावर केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 219 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेला 17.5 षटकांत अवघ्या 129 धावांत गुंडाळले. या सामन्यात ईशान किशनला 44 चेंडूत 81 धावांची स्फोटक खेळी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला, मात्र अभिषेक शर्माने आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला.

गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अभिषेक शर्मा यावेळी चेंडू हातात घेतल्यानंतर चमकला. त्याने 2.5 षटकांत केवळ 17 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांची संधीच मिळाली नाही.

या कामगिरीमुळे अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात तीन बळी घेणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही सलामीच्या फलंदाजाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी करता आली नव्हती.

फलंदाजीत अपेक्षित यश नाही

गोलंदाजीत ऐतिहासिक विक्रम केला असला, तरी या मालिकेत अभिषेकची फलंदाजी अद्याप अपेक्षेनुसार झालेली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात तो अवघी 1 धाव करून बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो केवळ 8 धावांवर माघारी परतला.

त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना अभिषेकसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. गोलंदाजीत आत्मविश्वास मिळाल्यानंतर आता तो फलंदाजीतही मोठी खेळी करून टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.

ईशान आणि तिलकची दमदार फलंदाजी

भारतीय डावात ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 81 धावांची खेळी साकारली, तर उपकर्णधार तिलक वर्माने 29 चेंडूत नाबाद 60 धावा करत संघाला 219 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव लवकरच कोसळला.

गोलंदाजांची प्रभावी कामगिरी

अभिषेक शर्माच्या तीन बळींशिवाय यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवले. तसेच रवि बिश्नोई, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत भारताचा विजय अधिक भक्कम केला.

भारताने मालिका आधीच जिंकली असली, तरी आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या टी-20 सामन्याकडे लागले आहे. गोलंदाजीत इतिहास रचलेल्या अभिषेक शर्माकडून आता फलंदाजीतही मोठ्या खेळीची क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT