Akash Chopra reacting to Pakistan's performance in the World Test Championship Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: 'ते सवलतीच्या गुणांनीही पास होणार नाहीत', WTC मध्ये पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था! आकाश चोप्रानं उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

Aakash Chopra Comments on Pakistan WTC: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने पाकिस्तानच्या अत्यंत खराब कामगिरीवर सडकून टीका केली.

Manish Jadhav

Aakash Chopra Comments on Pakistan WTC: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चा हंगाम अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला. भारतीय संघासाठी आगामी श्रीलंका मालिका ही डब्ल्युटीसी फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे. सध्या क्रिकेट जगतात या शर्यतीची जोरदार चर्चा सुरु असतानाच, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने पाकिस्तानच्या अत्यंत खराब कामगिरीवर सडकून टीका केली. पाकिस्तानचा संघ ग्रेस मार्क्स दिले तरी WTC च्या फायनलमध्ये पोहोचू शकत नाही, असा बोचरा टोला त्याने लगावला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा (Pakistan) संघ सध्या सर्वात शेवटी म्हणजे नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या 5 कसोटी सामन्यांपैकी अवघा एक सामना जिंकला असून 4 सामन्यांत त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात अवघे 4 गुण आणि 6.67 टक्के पीसीटी जमा आहेत. या स्थितीवर बोलताना आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, गुणतालिकेत शेवटी आपले शेजारी आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोलावे तेच समजत नाही.

काही विद्यार्थी ग्रेस मार्क्स मिळवून तरी पास होतात, पण पाकिस्तानची स्थिती अशी आहे की, त्यांचा रोल नंबरच जप्त केला जाईल. अवघे 6 टक्के गुण हे काय पॉइंट्स आहेत का, असा थेट सवाल करत त्याने पाकिस्तानच्या दयनीय अवस्थेची खिल्ली उडवली.

दरम्यान, WTC गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 84 गुणांसह आणि 87.50 टक्के पीसीटीसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका 75 टक्के पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, भारतीय संघ सध्या 9 सामन्यांत 4 विजय, 4 पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह 52 गुण आणि 48.15 टक्के पीसीटी घेऊन पाचव्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघाला फायनल गाठायची असेल तर येणारे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. WTC च्या या सायकलमध्ये भारताला अजून 9 सामने खेळायचे आहेत. जर भारताला दुसऱ्या कोणत्याही संघावर अवलंबून न राहता थेट फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. भारतीय संघाने 9 पैकी 8 सामने जिंकल्यास त्यांचा पीसीटी 68.5 वर पोहोचेल, तर सर्व 9 सामने जिंकल्यास पीसीटी 74.1 होईल. यामुळे भारत पुन्हा एकदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT