WHO Report  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WHO चा गंभीर इशारा! 2030 पर्यंत रक्तदाब, नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे 50 कोटी रूग्ण असतील

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुकताच शारीरिक हालचाली यावर अहवाल जाहीर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुकताच शारीरिक हालचाली यावर अहवाल जाहीर केला आहे. आरोग्य संघटनेने शारीरिक हालचालीची शक्यता अधोरेखित करत महत्वाचा इशारा देखील दिला आहे. 2030 पर्यंत रक्तदाब, नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रूग्ण 50 कोटी असतील असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शारीरिक हालचालीवर आधारित या अहवालात म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, बैठ्या जीवनशैलीमुळे गैर-संसर्गजन्य रोगाच्या (NCD) प्रकरणांत वाढ होऊ शकते. 2020 ते 2030 या कालावधीत जागतिक स्तरावर NCD 50 कोटी नवीन प्रकरणे समोर येतील असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यात 47 टक्के उच्च रक्तदाब आणि 43 टक्के नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रूग्ण असतील. असेही या अहवालात म्हटले आहे.

प्रत्येक चार प्रौढांपैकी एक किंवा अधिक तसेच, 80 टक्के किशोरवयीन मुले शारीरिक हालचाली करत नाहीत. यासोबतच मुलींमध्ये शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. शारीरिक हालचाल न केल्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो.

धूम्रपान, मद्याचे सेवन कमी करणे तसेच, दैनंदिन जीवनात अधिक तास शारीरिक हालचाली केल्यास अनेक रोग टाळता येऊ शकतात. असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. शारीरिक हालचाली मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात, यामुळे नैराश्य, चिंता यापासून आपला बचाव करता येतो तसेच, मुलांच्या मेंदूचा चांगला विकास होतो. असे WHO ने म्हटले आहे.

जे लोक नियमित शारीरिक हालचाली करतात त्यांना अकाली मृत्यू, हृदयविकार, नैराश्य, स्मृतिभ्रंश 7-8 टक्के आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका 20-30 टक्के कमी असतो. याशिवाय, ते हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT