Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: निखळ आनंदासाठी घरात फक्त 'हे' छोटे बदल करा

वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात आणि त्यांच्या आयुष्यात देखील सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. घराच्या बांधकामाव्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात काही छोटे बदल केल्यास, घरात सुख-समृद्धी कायम राहते, तसेच जीवनात आनंद निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे बदल...

देवघर

वास्तुशास्त्रानुसार देवघराला खूप महत्त्व आहे. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. तसेच, देवघराच्या वर किंवा खाली जिना किंवा स्नानगृह नसावे याची विशेष काळजी घ्यावी.

स्वच्छता

वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील धूळ आणि कोळ्याचे जाळे नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासोबतच बाथरूम देखील स्वच्छ असले पाहिजे, अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे. दार उघडताना आणि बंद करताना कुठलाही आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी.

कापूर जाळणे

वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि घराचे वातावरण शुद्ध होते.

झोपण्याची दिशा

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कधीही दक्षिण दिशेला पाय ठेवू नयेत. असे केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT