उन्हाळा आला की भाज्या आणि फळं फ्रेश ठेवणे गरजेचे असते. अतिउष्णतेमुळे भाजीपाला आणि फळे लवकर खराब होतात, त्यामुळे जेवणाची चवच नाही तर पौष्टिकतेवरही परिणाम होतो. तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करून भाज्या आणि फळं फ्रेश ठेऊ शकता.
फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवा
फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्या आणि फळं पूर्णपणे स्वच्छ करा. काही फळे आणि भाज्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. कारण काही फळे वायू सोडतात ज्यामुळे इतर फळे आणि भाज्या लवकर खराब होतात.
योग्य तापमानात स्टोअर करावे
सर्व भाज्या आणि फळांसाठी समान तापमान ठेवणे योग्य नाही. काहींना थंड तर काहींना सामान्य तापमानात ठेवावे लागते. टोमॅटो आणि केळी फ्रिजमध्ये ठेऊ नका. कोथिंबीर, मेथी , काकडी स्वच्छ करून फ्रिजमध्ये ठेवावे.
पाण्यात ठेवू नका
फळे आणि भाज्या पाण्यात भिजवून ठेवू नका. कारण त्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. त्याऐवजी, त्यांना कोरडे आणि हवेशीर ठेवा.
कागदी टॉवेल वापरा
फ्रिजमध्ये भाज्या आणि फळं ठेवताना त्यांच्याभोवती पेपर टॉवेल ठेवा. हा पेपर टॉवेल जास्त ओलावा शोषून घेईल यामुळे भाज्या आणि फळं जास्त दिवस फ्रेश राहतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.