Crispy Paneer Balls, Paneer Balls Recipe in Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Recipe: चवदार आणि झटपट तयार होणारा पदार्थ 'Crispy Paneer Balls'

क्रिस्पी पनीर बॉल्स सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

दैनिक गोमन्तक

क्रिस्पी पनीर बोल्स हा पदार्थ केव्हाही तयार करून खाउ शकतो. दिवसभरात थोडीशी भूक लागली तर झटपट तयार करता येते, तर मुलांच्या पार्टीमधील हा हेल्दी स्नॅक्स आहे. पनीरमध्ये प्रथिने भरपूर असतात, त्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठीही (Health) त्याचा फायदा होतो. क्रिस्पी पनीर बॉल्स बनवायला अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी पनीर बोल्स कसे बनवायचे. (Crispy Paneer Balls Recipe in Marathi)

* साहित्य

पनीर बारीक किसलेला – 1/2 किलो
बारीक चिरलेला कांद – 1
रवा – 1/2 कप
मैदा – 4 टीस्पून
लाल मिरची पावडर – 1/2 टीस्पून
आमचूर – 1/2 टीस्पून
आले-लसूण पेस्ट – 1/2 टीस्पून
तेल
मीठ चवीनुसार घ्यावे.

* कृती

सर्वात पहिले पनीर बारीक किसून घ्यावे. एक बाउल यामध्ये पनीरमध्ये 4 चमचे सर्व पीठ घाला आणि चांगले मिक्स करावे. यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, आमचूर, आले-लसूण पेस्ट घालून एकजीव करावे. यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करून चांगले एकजीव करावे. या मिश्रणाचे हाताच्या मदतीने लहान गोळे तयार करावे. नंतर एका कढाईमध्ये हे पनीरचे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे. तयार आहेत क्रिस्पी पनीर बॉल्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT