Tiranga Paratha Recipe:
Tiranga Paratha Recipe: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tiranga Paratha Recipe: प्रजासत्ताक दिन बनवा खास तिरंगा पराठासोबत, वाचा ही खास रेसिपी

दैनिक गोमन्तक

Republic Day Special Recipe: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरात तिरंग्याची काही रेसिपी ट्राय करायची असेल तर झटपट तिरंगा पराठा बनवा. हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये पराठ्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही तिरंगा पराठा तयार करून हा प्रजासत्ताक दिन खास बनवू शकता.

तिरंगा पराठा बनवण्यासाठी साहित्य -

पराठ्याच्या केशर भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • एक चतुर्थांश वाटी गाजर प्युरी

  • चवीनुसार मीठ

पराठ्याच्या हिरव्या भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • पाऊण वाटी मटार प्युरी

  • चवीनुसार मीठ

पराठ्याच्या पांढऱ्या भागासाठी

  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ

  • चवीनुसार मीठ

  • तिरंगा पराठा बनवण्याची पद्धत

तिरंगा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक करुन घ्या.

गाजर आणि मटारची प्युरी तयार करुन बाजूला ठेवा.

यानंतर एका भांड्यात पीठामध्ये गाजर प्युरी आणि मीठ एकत्र करून मळून घ्यावे.

दुसऱ्या भांड्यात मटारची प्युरी आणि मीठ पिठात मिसळून वेगवेगळे मळून घ्या.

त्यानंतर त्याच भांड्यात मीठ घालून साधे पीठ मळून घ्या.

आता तुमच्याकडे तिन्ही रंगांचे वेगवेगळे पीठ आहेत.

आता तिन्ही पिठांचा एक छोटासा भाग घ्या आणि ते एकमेकांना सारखे दाबा.

पीठ तिरंग्यासारखे कापून घ्या. गोळे पराठ्याच्या आकारात लाटून घ्या.

गरम तव्यावर तेल लावून पराठा बेक करा.

तुमचा चविष्ट तिरंगा पराठा तयार आहे.

गरमागरम पराठा चटणी, लोणचे किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT