तांदळाची उकळ  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi Special Recipe: तांदळाची उकड

ही उकड खायला देताना वर भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरम द्यावी.

दैनिक गोमन्तक

देशात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पांच्या मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. चला तर मग जाणून घेवूया तांदळाची उकळ कशी बनवतात.

साहित्य

एक वाटी तांदळाची पिठी, दोन वाट्या ताक, फोडणीचे साहित्य, तूप, दोन चमचे शेंगदाणे, दोन चमचे डाळं, कोथिंबीर, ओले खोबरे, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा किसलेलं आलं.

कृती

प्रथम तूप गरम करून हिंग-जिऱ्याची फोडणी करावी. हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा कीस घालून थोडं परतावं व मग हळद घालावी. शेंगदाणे आणि डाळं या फोडणीत परतून घ्यावं. मग ताक घालून उकळी आणावी. त्यात तांदळाची पिठी हळूहळू घालावी. उलथन्याच्या टोकाने हलवावी. गुठळी होऊ देऊ नये. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. पुन्हा एकदा हलवून घ्यावे व आणखी एक वाफ आणावी. उकड थोडी चकचकीत दिसू लागली आणि खमंग वास आला, की चांगली शिजली असे समजावे. ही उकड खायला देताना वर भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरम द्यावी.

मानसी काणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT