Cycle of Thoughts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cycle of Thoughts: आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं?

Health मनात सुरु असलेलं हे विचारचक्र (Cycle of Thoughts) कशा पद्धतीने थांबवायचं

दैनिक गोमन्तक

मागच्या लेखात आपण विचारचक्र म्हणजे काय आणि विचारचक्र आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस याविषयी जाणून घेतलं. त्यानंतर आता मनात सुरु असलेलं हे विचारचक्र कशा पद्धतीने थांबवायचं ते जाणून घेऊयात. (How to stop the cycle of thoughts)

आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं? आपल्यातील प्रत्येकाला हा प्रश्न आहेच आणि त्याची नितांत गरजदेखील आहे. विचारांना विचार थांबवू शकत नाहीत. विचारांवर एकच शस्त्र आहे ते म्हणजे शांतता. शांत बसणं इतकं सोपं असतं तर प्रश्नच मिटला असता! या शांततेची प्रॅक्टिस योग सरावात होत असते. नियमित योगसाधना दोन विचारांमध्ये पॉज निर्माण करायला शिकवते. हा पॉज आपल्याला हळूहळू वाढत न्यायचा आहे. जितकी याची प्रॅक्टिस होईल तितकी मनाला सवय लागत जाते आणि हळूहळू मनाची ठेवण बनते.

अशी सवय विकसित झाल्यावर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकड उड्या मारतं, तसं मन एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडं धावणार नाही. त्याला थांबायची सवय लागेल. मग बाहेरून उत्तेजन आलं, तरी विचारांचा गदारोळ न होता ‘थांबा, पाहा, पुढे जा’ असे आपोआप व्हायला लागेल. कारण अगोदरच विचारांनी थकलेल्या मनाला या शांत बसण्यानं विश्रांती मिळेल आणि मग ते मन अशी विश्रांती कशी मिळेल यासाठी योगद्वारे प्रयत्न करू लागेल. विचारांना थांबवायचं कसं हे शास्त्र आपल्याला योग शिकवतो, ते समजलं आणि विकसित केलं, की मग तेच विचार कधी थांबवायचे ही कला आपोआप आत्मसात होत जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT