Oily Food Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oily Food Tips: एक महिना करा तळलेल्या पदार्थांना बाय-बाय...शरीरात दिसतील 'हे' मोठे बदल

दैनिक गोमन्तक

Oily Food Tips: अनेक लोकांना तेलकट पदार्थ खायला खुप आवडतात. हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते, मग ते पुरी, भजिया, कढीचे पकोडे किंवा कोणतेही स्टार्टर असो, ते तळलेले असतात. लोकांनाही हे तळलेल्या पदार्थ खायला आवडतात. 

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही 1 महिन्यासाठी तळलेले पदार्थ सोडले तर तुमच्या शरीरात काय बदल होतील आणि त्याचे काय फायदे होतील?

 जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की एक महिन्यापर्यंत तळलेले पदार्थ आहारातून काढून टाकल्याने तुमच्या शरीरात सकारात्मक फायदे होउ शकतात.

  • मुरुम कमी होतात

मुरुमांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठी तळलेले पदार्थ खाणे सर्वात हानिकारक ठरते. जर तुम्ही एक महिना तळलेले पदार्थ टाळले तर तुमच्या मुरुमांची समस्या कमी होईल. कारण तुमच्या त्वचेवर (Skin) येणारे तेल कमी होईल.

  • हृदयाचे आरोग्य निरोगी 

जर तुम्ही एक महिना तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळले तर तुमचे हृदय निरोगी राहू शकते. कारण तळलेल्या पदार्थांमध्ये असंतृप्त आणि ट्रान्स फॅट आढळते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी (Health) हानिकारक आहे.

  • एनर्जेटिक वाटते 

जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थं खाता तेव्हा तुम्हाला सुस्ती येते. तुम्हाला खूप जड वाटते, परंतु जर तुम्ही हे पदार्थांचे सेवन टाळल्यास दिवसभर एनर्जेटिक वाटते.  

  • झोपेची समस्या कमी होते

जेव्हा तुम्ही तळलेले अन्न खात नाही आणि हलके जेवण घेतो तेव्हा तुम्हाला चांगली झोप येते. तुमचा मूडही दुसऱ्या दिवशी चांगला राहुन तुमचे कामात लक्ष राहते.

  • अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका

तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास जास्त होतो. जर तुम्ही पोटदुखी किंवा अॅसिडिटीच्या समस्येने हैराण असाल तर असे पदार्थ एक महिना खाणे टाळावे. यामुळे तुमची पचनशक्ती किती सुधारते.

  • प्रतिकारशक्ती वाढवणे 

एक महिना तेलकट पदार्थांचे सेवन न केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण तेलकट अन्नाऐवजी पौष्टिक आहार घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT