Garlic Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Garlic Tea: हृदयविकारांवर लसणाचा चहा रामबाण उपाय

Garlic Tea: लसणाचा चहा प्यायल्याने तुमचा लठ्ठपणाही कमी होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण लसणाचा चहा देखील बनवला जातो. तो पिण्यास आरेग्यदायी असून चवीलाही चांगला असतो. लसणाचा चहा आरोग्याशी संबंधित आजारही दूर करतो. लसणामध्ये प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ते अनेक रोगांपासून संरक्षण करते. म्हणूनच आल्याच्या चहा व्यतिरिक्त तुम्ही लसूण चहा देखील करुन पाहू शकता. 

लसणाचा चहा प्यायल्याने तुमचा लठ्ठपणाही (weight) कमी होऊ शकतो. याशिवाय हिवाळ्यात (Winter) आराम मिळतो. लसणात (Garlic) व्हिटॅमिन ए, बी1, बी2 आणि सी सर्वाधिक प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेशी संबंधित समस्यांना देखील दूर ठेवते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लसणाचा चहा हृदयविकारांसाठी (Heart) सर्वात फायदेशीर आहे, या चहामध्ये चयापचय आणि रोगप्रतिकार (Immunity) शक्ती जास्तीत जास्त आहे. जे तुमचे शरीर योग्य ठेवण्यास मदत करते. 

लसणाचा चहा कसा बनवावा

लसणाचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक कप पाणी उकळवा, नंतर त्यात चिरलेले आले आणि लसूण टाका. तुम्ही ते कमीत कमी 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर थंड होऊ द्या. आता ते गाळून घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला, आता तुमचा लसूण चहा तयार आहे. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा अधिक फायदेशीर ठरेल. लसणाचा चहा रोज सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT