Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना

लाकडी मखरात कप्पे ठेवून, त्यात हिंदू धर्मातल्या लोकप्रिय देवतांच्या चौकटीने भिंतीची शोभा वृद्धिंगत व्हायची.

दैनिक गोमन्तक

एके काळी गोव्याच्या प्रत्येक गावात वसलेल्या ‘मेस्तावाड्या’ वरचे कारागीर सागवान, शिसवीसारख्या टिकाऊ लाकडाचा वापर करून कलात्मकतेने मखराची निर्मिती करायचे. या लाकडी मखरात कप्पे ठेवून, त्यात हिंदू धर्मातल्या लोकप्रिय देवतांच्या चौकटीने भिंतीची शोभा वृद्धिंगत व्हायची.

काही संयुक्त कुटुंबात गणपतीला आसनस्थ करण्यासाठी अशा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मखरांचा आजही उपयोग केला जातो. गणेशोत्सवात वापर झाल्यानंतर ही मखरे पुन्हा व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवली जातात. चतुर्थीत गणपतीचे आगमन होण्यापूर्वी ही मखरे बाहेर काढून त्यांची साफसफाई होते. एखादा भाग अथवा एखादे चित्र खराब झाल्यास त्याजागी नवीन चित्र बसवले जाते. काही मखरे नव्या रंगांनी सजतात तर काहींना रंगीत कागदांच्या कलाकृती करून त्याद्वारे सजवले जाते.

सागवान किंवा शिसवीचे लाकूड मूल्यवान आणि टिकाऊ असल्याने त्यांचा वापर शेकडो वर्षे होऊ शकतो. गोव्याच्या भूमीत पूर्वापार काष्टशिल्पकलेला जो वारसा आहे त्याचे दर्शन अशा मखरांतून होते. केवळ साफसफाई, रंगरंगोटी आणि नाममात्र सजावट करून असे मखर उत्सवासाठी सिद्ध होते. आजच्या नव्या पिढीला प्लास्टीक, थर्माकोलसारख्या आकर्षक (पण प्रदूषणकारी) मखरांची मोहिनी पडल्याकारणाने गोव्यातल्या कलाकारांचा हा समृद्ध वारसा विस्मृतीत जात आहे. उच्च दर्जाच्या कलाकुसरीने युक्त अशी ही लाकडांची मखरे अडगळीत पडू लागली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT