माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघंही विभक्त होण्याच्या विचारात असल्याच सांगितलं जातंय.
वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
कुटुंबातील जवळच्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीनुसार, सेहवाग आणि आरती गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. अद्याप याबाबत सेहवाग किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सेहवाग आणि आरती यांचा विवाह २००४ मध्ये झाला होता, आणि त्यांना दोन मुले आहेत. सध्या, त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील या बदलांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
वीरेंद्र सेहवाग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे होती. कसोटीत दोन वेळा 300+ धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
सेहवागची पत्नी आरती अहलावत हिनं अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. जवळपास 7 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर सेहवाग आणि आरतीनं 2004 मध्ये लग्न केलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.