Claude Alvares Dainik Gomantak 
गोवा

गोव्यातील खाणी चार वर्षांत तरी सुरू होतील काय?

क्लॉड आल्वारिस: 85 लिजांचा पर्यावरण दाखला कधीच संपला

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील खाणी आपण सहा महिन्यांत सुरू करू, असे वक्तव्य केले आहे. मात्र, या 85 लिजांचे रूपांतर आता 10 किंवा 15 ब्लॉक्समध्ये करावे लागणार आहे. त्यासाठी पुन्हा पर्यावरणीय दाखले मिळवावे लागतील. ज्यांना हे ब्लॉक्स लिलावाद्वारे बहाल करण्यात येतील, त्यांनाच पर्यावरण दाखले मिळवण्याचे बंधन राहील, असे मत गोवा फाऊंडेशनचे क्लॉड आल्वारिस यांनी आज ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यातील सर्व लीज रद्द केले. त्यामुळे त्यांचा पर्यावरणीय दाखला आपोआपच रद्द झाला आहे. या लिजेस आता अस्तित्वात नाहीत. दुसरे, आता लिजांचे ब्लॉक्समध्ये रूपांतर केल्याने

त्यांचा आकार आणि स्वरूप बदलणार आहे. त्यांना पर्यावरण दाखला पुन्हा घ्यावा लागेल, अशी माहिती गोव्यातील खाणींसंदर्भात गेली 30 वर्षे न्यायालयात लढा देणारे व त्यांचा कायदेशीर अभ्यास केलेले पर्यावरण रक्षक आल्वारिस यांनी दिली.

गोवा फाऊंडेशनचे खाण कंपन्यांकडून येणी वसूल करण्यासंदर्भातील काही खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या दोन अर्जांद्वारे खाण कंपन्यांकडून अंदाजे 68 हजार कोटी रुपये वसूल करण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरण संघटनेने केली आहे. 2007 ते 2012 या काळात लिजेसचा कालावधी संपुष्टात आला होता, तरी खाणी चालू राहिल्या. त्या काळात खाण कंपन्यांनी निर्यात केलेल्या मालाचा अंदाजे महसूल 65 हजार कोटी आहे.

क्लॉड आल्वारिस यांच्या मते, हे राज्याच्या जनतेचे पैसे आहेत आणि ते राज्याच्या विकासासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने सरकारला अजून त्याची आवश्‍यकता भासत नाही, याचे कारण हे सरकार खाणींच्या दबावाखाली वाकलेले आहे. ‘केंद्र सरकार जर खरोखरच खाणींचा ताबा चुकार आणि भ्रष्ट खाण कंपन्यांकडून काढून घेऊन स्वत:च्या ताब्यात घेऊ पाहते आणि कायद्याचे राज्य जर प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगत असेल तर केंद्रानेच आता राज्य सरकारला लेचीपेची भूमिका बदलण्यास भाग पाडले पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया आल्वारिस यांनी दिली.

लिलाव प्रक्रिया रखडण्याची शक्यता: सरकारची लिलाव प्रक्रिया किमान दोन वर्षे चालू शकते. त्याआधी खनिज कंपन्या निश्‍चितच न्यायालयात जाऊन सरकारच्या निर्णयाला आव्हान देतील. त्यात लिलाव प्रक्रिया काही वर्षे रखडू शकते. त्यामुळे खाणी प्रत्यक्षात सुरू व्हायला चार वर्षांचा काळ जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया एका प्रश्‍नावर गोवा फाऊंडेशनचे प्रवक्ते आल्वारिस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT