wild boar attack in Goa Dainik Gomantak
गोवा

Wild Boar Attack: पैंगीणीत रानडुक्कराचा जीवघेणा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेने केले हिंस्त्र जनावराशी दोनहात

Wild Boar Attack Cancona Goa: पैंगीण काणकोण येथे शेतात काम करत असतानाच एका रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला

Akshata Chhatre

काणकोण: पैंगीण काणकोण येथे शेतात काम करत असतानाच एका रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला. वेळवाडा पैंगीण येथील जयंती वेळीप नावाची महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. सकाळी शेतात काम करत असताना अचानक रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला, तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी झटपट केली मात्र यात ती गंभीर जखमी झाली आहे.

मिलेल्या माहितीनुसार, शेतात काम करणाऱ्या महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवतात तिने दोन्ही हातांच्या साहाय्याने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत जयंती वेळीप या महिलेने त्या हिंस्त्र जनावरेही दोन हात केले, आणि या संघर्षात शेवटी तो रानडुक्कर पळून गेला.

जखमी महिलेवर हल्ल्यानंतर उपचार करण्यात आले, तिला प्राथमिक उपचारांसाठी काणकोण येथील समुदायीक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर शेताचा मालक लक्ष्मण प्रभुगांवकर याने वनविभागत याबद्दल तक्रार नोंदवली आहे. वनविभाग अधीकारी अनंत वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून घटनेवर अधिक तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक पावलं उचलली जातील तसेच जखमी महिलेला वनविभागाकडून भरपाई दिली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT