Pradesh Congress President Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

राज्य आर्थिक संकटात असताना सरकार नवे राजभवन बांधून पैशाची उधळपट्टी करतेय!

राज्य आर्थीक संकटात असताना नवे राजभवन बांधून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: दोनापावला येथे नवीन राजभवन इमारत बांधण्यास राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Governor Sreedharan Pillai) यांनी मंजुरी दिल्यामुळे गोवा सरकारने (Government of Goa) नवीन राजभवन बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दुसरीकडे राज्य आर्थीक संकटात असताना नवे राजभवन बांधून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला आहे. तसे पाहता माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांच्याकाळात गोवा सरकारने नवे राजभवन बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र मलीक यांनी तो फेटाळला होता. त्यानंतरच्या राज्यपालांच्या काळातही याबाबतचा प्रस्ताव रखडला होता. नवे राज्यपाल पिल्लई यांच्यासमोर सरकारने नव्या राजभवनाचा ठेवलेला प्रस्ताव राज्यपालानी मंजूर केला आहे.

दरम्यान कोरोना महामारीमुळे (Covid 19) राज्याची अर्थीक स्थिती कमजोर झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री सांगत असताना गरज नसताना नवे राजभवन बांधण्याचे प्रयत्न हे भ्रष्टाराचाचेच उदाहरण असल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली आहे. माजी राज्यपाल मलीक (Former Governor Malik) यांनी नव्या राजभावनाचा प्रस्ताव फेटाळल्यामुळेच त्यांची लगेच बदली केली गेली. असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Lake Pollution: गोव्याची जलसंपदा वाचेल का?

Ebola Virus Case: राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा पहिला संशयित रुग्ण; युगांडाच्या महिला पर्यटकामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

Goa Beach: पेडण्यात पर्यटनाची भरारी!

Pregnant Woman Viral Video: 9 महिन्यांची प्रेग्नन्सी आणि चक्रासन! महिलेचा थक्क करणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

Goa Lake Ecosystem: ज्याला आपण 'विकास' समजलो, तोच ठरला तलावांचा काळ! काँक्रीटच्या भिंतींमुळे गोव्याचे जलस्रोत कसे बनले 'स्मशान'?

SCROLL FOR NEXT