Utpal Parrikar and TMC Dainik Gomantak
गोवा

Goa Election: ...तर आम्ही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देऊ: TMC

भाजपने उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढणाचा निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पणजीत उमेदवार न उभा करण्याचा विचार करत आहे. त्याऐवजी ते अपक्ष निवडणूक लढणाऱ्या उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणार, अशी माहिती समोर येत आहे. (Utpal Parrikar Latest News)

भाजपने (BJP) उत्पल पर्रीकर यांना पणजीतून (Panaji) तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढणाचा निर्णय घेतला. आम्ही जिंकू शकणाऱ्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, पणजीमध्ये उत्पल पर्रीकर बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करतील म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देऊ इच्छितो. याबाबत पुढील 24 ते 48 तासांत निर्णय घेतला जाईल, असे TMC च्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने सांगितले.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी असल्यामुळे तृणमूल काँग्रेसला (TMC) याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे दिसत आहे.

उत्पल हे निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असे आश्वासन मिळवण्याचा तृणमूल प्रयत्न करत आहे. निवडून आल्यावर उत्पल पर्रीकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास तृणमूल विचित्र परिस्थितीत सापडेल. तृणमूलच्या सूत्रांनी सांगितले आहे की, उत्पल यांच्या "निवडणुकीनंतरच्या योजने" बद्दल पूर्ण स्पष्टता आल्यानंतरच त्यांना पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT