Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam : तिलारीतून विसर्ग सुरु; उत्तर गोव्याला पूराचा धोका नाही

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याबाबतची माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

सतत सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी धरणाचा पाणीसाठी इशारा पातळीजवळ पोचल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसे असले तरी उत्तर गोव्यात पुराची भीती नाही आहे. गोव्यात जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा तिलारीचे पाणी सोडले जात नाही अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

शनिवारी तिलारी धरणातील पाणी साठ्याने सांडवा पातळी गाठल्याने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. तो विसर्ग कमी प्रमाणात होता. मात्र, सोमवारी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. उत्तर गोव्याला पुराचा धोका नसल्याची माहिती गोवा जलस्त्रोत खात्याकडून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT