पणजी: राज्यात थंडी उशिरा दाखल झाली असली, तरी मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानाचा पारा 19.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरही धुक्याची चादर दिसली. सकाळच्या वेळी दाट धुके महामार्गावर दिसले. याचाच परिणाम म्हणून महामार्गावरील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळाली.
दरम्यान, हवेत गारटा वाढल्याने दुपारी 11 वाजेपर्यंत महामार्ग परिसरात धुके कायम राहते. त्यामुळे दृश्यमानता कमी होत असून अपघाताची भिती संभावते. मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) माणगाव परिसरात सकाळच्या वेळी 24 डिग्री सेल्सिअसवर असलेले तापमान रात्रीच्या वेळी 12 डिग्री सेल्सिअसरवर पोहोचत आहे. मागील काही दिवसांपासून महामार्गावर धुक्याची चादर कायम असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (डिप्रेशन) तामिळनाडूसह (Tamil Nadu) परिसरात पावसाचा जोर वाढला असून हे क्षेत्र शनिवारी (ता. 30) सकाळी तामिळनाडूतील महाबलीपूरम आणि पुदुच्चेरीतील कराईकलदरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. सहा तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र ताशी नऊ किमी वेगाने उत्तर दिशेला सरकले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.