Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi : वाळपई-बेळगाव अंतर घटणार! पाली जांभळीचे तेंब रस्त्याचे काम पूर्ण

पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण झाल्यामुळे वाळपईहून बेळगांवकडे जाणाऱ्यांसाठी सुमारे 35 किमी इतके अंतर कमी होणार आहे.

dainik gomantak team

Valpoi : कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पाली जांभळीचे तेंब रस्त्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण झाल्यामुळे वाळपईहून बेळगांवकडे जाणाऱ्यांसाठी सुमारे 35 किमी इतके अंतर कमी होणार आहे. या मार्गाचा फोंड्यातील प्रवाशांनाही लाभ होणार आहे. या रस्त्यासाठी 4 कोटी खर्च करण्यात आलेला आहे.

पर्ये मतदारसंघातील ठाणे डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात येणारा सुर्ल गाव निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पाली जांभळीकडे जाणारा रस्ता होणे गरजेचे होते. या रस्त्यामुळे सुमारे 35 किमी अंतर कमी होणार आहे. बेळगाव - वाळपई अंतर 70 किमी इतके होणार आहे.

हा रस्ता म्हादई अभयारण्यातून जात असल्याने मोठे चढ उतार आहेत. त्यामुळे सुमारे दोन किमी अंतराचा रस्ता पेव्हर्स घालून करण्यात आलेला आहे. यावरून अवजड वाहतूक झाल्यास हा रस्ता लवकरच खराब होण्याची भीती आहे. यामुळे अवजड वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ प्रवासी वाहतूक करता येणार आहे.

लवकरच रस्त्याचे उद्‍घाटन

रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम अखेर पूर्ण झालेले आहे.त्यामुळे पालीहून जांभळीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता लवकरच या रस्त्याचे आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते रितसर उद्‍घाटन होईल,असे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी स्थानिक पंच सदस्य सुरेश आयकर तसेच ठाणे सरपंच व आमदार डाॅ. दिव्या राणे यांचे विशेष प्रयत्न होते.

पर्यटनदृष्ट्या विकासाची संधी

वाळपईकडून जांभळीचे तेंब त्यानंतर चोर्ला, कणकुंबी, जांबोटी मार्गे रस्ता बेळगावपर्यंत जातो. त्यामुळे चोर्ला घाटातून सत्तरीत येणाऱ्या पर्यटकांना वाव मिळणार आहे. सुर्ला गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पाली धबधबा, माळोली तसेच तांबडीसुर्लकडे जाणाऱ्या पर्यटकांना चांगली सोय आता या रस्त्यामुळे होणार आहे. हा रस्ता वन क्षेत्रात येत असल्याने हाॅटमिक्स डांबरीकरण होणे शक्य नव्हते, त्यामुळे पेव्हर्स बसविण्यात आलेले आहेत.

सत्तरीतील निसर्ग पर्यटनासाठीही या रस्त्याचा फायदा होणार आहे. सुर्ला येथील धबधबा आकर्षक आहे. यामुळे पर्यटकांना पावसाळ्यात या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटता येईल. लोकांना दिलेली आश्वासने टप्याटप्याने पूर्ण करण्यावर आपला भर आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार पर्ये

आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्यामुळे पाली गावाचा विकास झालेला आहे. एकूणच पर्ये मतदारसंघातील विविध विकासकामे राणे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण होत आहेत. कित्येक वर्षापासून रखडलेला पाली जांभळीचे तेंब हा रस्ता अखेर मार्गी लागून पूर्णत्वास आला आहे. परिसरातील ग्रामस्थांतही याचे मोठे समाधान आहे.

- सुरेश आयकर,स्थानिक पंच सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट अधिक गडद होणार

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

SCROLL FOR NEXT