वाळपई: गणेश नगर, सर्वण-करापूर साखळी येथील निवृत्त सैनिक गणपत विष्णू गावस यांनी गोव्यातून सायकलवर पंढरपूर आषाढी वारी करण्याचा अनोखा निर्धार केला आहे. चार ते पाच दिवसांत पांडुरंगाच्या चरणी पोहोचण्याचे ध्येय त्यांनी ठरवले असून त्यांनी मंगळवारी यात्रेला सुरुवात केली.
गणपत गावस यांनी सैन्यात तब्बल २१ वर्षे देशसेवा केली. सैन्यात असताना आषाढी एकादशीला पंढरपूर वारीची इच्छा अपूर्ण राहिली. सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदल्या आणि कर्तव्यामुळे हा योग जुळून आला नाही. मात्र आता निवृत्तीनंतर त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःची आवड आणि फिटनेस जोडत सायकलवरून वारी करण्याचा निश्चय केला आहे.
वारी दरम्यान ते रात्र वारकरी वसतिगृह, मंदिर किंवा वारकऱ्यांसोबत भजनात घालवणार आहेत. वारीच्या मार्गावर काही ठिकाणी विश्रांती घेऊन पुन्हा सायकलवारीला सुरूवात करणार आहेत.
७०-८० कि. मी प्रवास
गावस म्हणाले, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लहानपणापासूनच होती. सैन्यात असताना संधी मिळाली नाही. पण आता पंढरपूरला सायकलवरून पोचायचं ठरवलं आहे.
दररोज ७० ते ८० किलोमीटर सायकल चालवत चार ते पाच दिवसांत विठोबाच्या चरणी पोहोचणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.