मडगाव: सर्व विरोधकांना एकत्र आणून भाजपला हरवण्याची सुवर्णसंधी सध्या तयार झाली असून ती भूमिका विजय सरदेसाई यांनी निभावावी, अशी मागणी आज राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या ५५ व्या वाढदिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. तसेच आता भाजप हटाव मोहिमेची धुरा विजय सरदेसाई यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजप पक्षात असलेले फ्रान्सिस सिल्वेरा, तृणमूल काँग्रेसचे किरण कांदोळकर, राष्ट्रवादीचे जुझे फिलिप डिसोझा, माजी आमदार नरेश सावळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जुझे फिलिप डिसोझा यांनी विजय सरदेसाई यांच्यात जे गुण आहेत, ते मुख्यमंत्री होण्याइतपत असून भविष्यात विजय सरदेसाई गोव्याचे मुख्यमंत्री होणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी आमदार नरेश सावळ यांनी विजय सरदेसाई हे धाडसी नेतृत्व असून सर्व गोमंतकीयांचे त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले असल्याचे म्हटले.
राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी भाजप विरोधी मते संघटित झाल्यास भाजप सहज हरू शकतो हे दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे, पण त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि हे काम फक्त विजय सरदेसाई हे एकटेच करू शकतात, असे सांगितले.
विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध असून सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करेन, असे सांगितले. गोवा वाचविण्याची गरज असल्याची हाक आमदार विजय सरदेसाई यांनी देताना समविचारी लोकांना बरोबर घेऊन गोव्यासाठी अजेंडा राबवून वर्षभरात संपूर्ण गोवा पिंजून काढणार असल्याची घोषणाही केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.