Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime : हणजुणेत महिलेचा विनयभंग; शिवीगाळ आणि मारहाणही...

दोन तरूणांना अटक, एक जण परप्रांतीय, पोलिसांनी कारदेखील केली जप्त

Akshay Nirmale

Anjuna Crime: दक्षिण गोव्यात मडगाव येथील एका महिलेला दोघा गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर गोव्यातील हणजुणे (Anjuna) येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी हणजुणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

पोलिसांनी दोन संशयित तरूणांना अटक केली आहे. नौमान कावेश साबरी (वय 23) आणि राज शिंदे (28) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, या दोघांनीही संबंधित महिलेला स्पर्श केला. तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.

या महिलेला साबरी आणि शिंदे याने शिवीगाळदेखील केली. हणजुणे पोलिसांनी साबरी आणि शिंदे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडील आय ट्वेंटी कार (GA 03 Y 3399) देखील जप्त करण्यात आली आहे.

नौमान साबरी हा मूळचा जयंतीनगर, रायपूर, छत्तीसगड येथील आहे. तर राज शिंदे हा बार्देश येथील आहे. दोघांनीही महिलेला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तिला खाली पाडले आणि तिच्यावर हल्ला केला. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हणजुणेतील पोलिस उप निरीक्षक धीरज देवीदास या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT