Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 30 फूट खोल नदीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa highway accident car plunges into river two dead: अपघातात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

Pramod Yadav

Mahad News: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २५ ते ३० फूट नदीत कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत आज (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला. अपघात कारचा चक्काचूर झाला आहे.

देवयानी दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावरून एक कार महाडकडून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत कार वरील नियंत्रण सुटले आणि कार २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. यात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले पण दोघांचा मृत्यू झाला होता. तर, जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातस्थळी माणगाव पोलिसांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने वर काढण्यात आली. दरम्यान, या भागात यापूर्वी देखील अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT