Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 30 फूट खोल नदीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa highway accident car plunges into river two dead: अपघातात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

Pramod Yadav

Mahad News: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २५ ते ३० फूट नदीत कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत आज (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला. अपघात कारचा चक्काचूर झाला आहे.

देवयानी दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावरून एक कार महाडकडून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत कार वरील नियंत्रण सुटले आणि कार २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. यात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले पण दोघांचा मृत्यू झाला होता. तर, जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातस्थळी माणगाव पोलिसांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने वर काढण्यात आली. दरम्यान, या भागात यापूर्वी देखील अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT