Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Traffic Police :मद्यपान करून वाहन चालवण्‍याची कुडचडे परिसरात यंदा 86 प्रकरणे

Traffic Police : जर नियमांचे पालन केलेच नाही तर त्‍यांच्‍यावर कारवाईही होऊ शकते. वाहतूक नियमांचे उल्‍लंघन हा गंभीर गुन्‍हा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Traffic Police : केपे, कुडचडे परिसरात मद्यपान करून वाहन चालविण्‍याची यावर्षी नोव्‍हेंबरपर्यंत ८६ प्रकरणे नोंद झाली आहेत. मात्र मागील वर्षापेक्षा ती १२ टक्‍क्‍यांनी कमी आहेत. मध्‍यमवर्गीय तसेच युवकांचा त्‍यात जास्‍त सहभाग असतो, अशी माहिती कुडचडे वाहतूक खात्‍याकडून उपलब्‍ध झाली आहे.

अशा प्रकारांना आळा घालण्‍यासाठी विशेष मोहीम रात्रीच्‍या वेळी पोलिसांकडून राबविली जाते. वाहतूक नियमांचे पालन केले तर असे प्रकार टाळता येतील. जर नियमांचे पालन केलेच नाही तर त्‍यांच्‍यावर कारवाईही होऊ शकते. वाहतूक नियमांचे उल्‍लंघन हा गंभीर गुन्‍हा आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा तर जीवघेणा प्रकार ठरू लागला आहे.

२०२० मध्‍ये मद्यमान पिऊन वाहन चालविण्‍याचे १६६० गुन्‍हे दाखल झाले होते. २०२१ मध्‍ये ही संख्‍या २६६ पर्यंत कमी झाली. यावर्षी जुलै अखेरपर्यंत पोलिसांनी जवळपास एक हजार खटले दाखल केले होते.

यंदा नोव्‍हेंबरपर्यंत कुडचडे परिसरात मद्यपान करून वाहन चालविण्‍याची ८६ प्रकरणे नोंद झालेली आहेत. चालू डिसेंबर महिन्‍यात १२ प्रकरणे नोंद झाली आहेत. २०२२ मध्‍ये ९८ प्रकरणे नोंद झाली होती.

- विजयनाथ कवळेकर, वाहतूक निरीक्षक (कुडचडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT