Tilari Water  Dainik Gomantak
गोवा

तिळारीच्या पाण्याबाबत गोवा तहानलेलाच!

पाणी साठवणुकीबाबत प्रश्‍नचिन्ह: कालव्यांच्या दुरुस्तीकडे जलस्रोत खात्याचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

मोरजी: तिळारी प्रकल्पातून 70 टक्के पाणी आजपर्यंत गोव्याला मिळालेले नाही. त्यातील केवळ 10 टक्के पाणीच गोव्यासाठी सोडले जाते. उर्वरित 60 टक्के पाणी तिळारी प्रकल्पातून सोडले तर आपले कालवे भक्कम आहेत का किंवा हे पाणी साठवून ठेवण्यासाठी गोवा सरकारची योजना तयार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र सरकार व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिळारी पाण्याचा प्रकल्प उभारलेला आहे. त्यावर एकूण 952 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातील 70 टक्के आर्थिक वाटा गोवा सरकारचा आहे. त्यानुसार तिळारी प्रकल्पातून 70 टक्के पाणी गोव्याला देणे बंधनकारक आहे. सध्या गोव्याला तिळारी प्रकल्पातून 10 टक्के पाणी सोडले जात आहे. त्यातील काही पाणी बांदा-डोंगरपाल या भागाला जाते. शिवाय पेडणे तालुक्यातील तिळारी कालव्यातून पाणी नद्यांनाही सोडलेले आहे.

पेडणेत मोठमोठे प्रकल्प

सध्या पेडणे तालुक्यात मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तुये इस्पितळ, तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटी या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी आता किमान ३० पेक्षा जास्त एमएलडी पाण्याची गरज आहे. हे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एका बाजूने करोडो रुपये खर्च करून नदीवर पंपहाऊस बसवून पाणी वळवण्याचा प्रयत्न करत आहे; तर दुसऱ्या बाजूने तिळारी प्रकल्पातून येणारे पाणी त्याचे नियोजन नीटनेटके केले जात नाही, याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

गोवा-महाराष्ट्र लिखित करार: महाराष्ट्र सरकार 60 टक्के उर्वरित पाणी सोडत नाही, अशा तक्रारी सध्या वाढत आहेत. मात्र 70 टक्के पाणी पेडणे तालुका किंवा गोव्याकडे साठवून ठेवण्याची क्षमता आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. तिळारी प्रकल्प उभारताना गोवा आणि महाराष्ट्र यांच्या लिखित करार झाला होता. हा प्रकल्प उभारताना 70 टक्के आर्थिक वाटा गोवा सरकारने उचलायचा त्या बदल्यात 70 टक्के तिळारी प्रकल्पाचे पाणी गोव्याला देण्याचे कबूल करण्यात आले होते.

दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया

आजपर्यंत जलस्रोत खात्याने वाया जात असलेल्या पाण्याबाबत कोणतीच उपाययोजना केलेली दिसून येत नाही. सासोली, हणखणे, इब्रामपूर, चांदेल, धारगळ असे कालवे तयार करण्यात आले असून, ते ठिकठिकाणी कोसळले आहेत. त्यांना भगदाडे पडली आहेत. त्यातून दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्यांकडे जलस्रोत विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT