PM Kisan Yojana Dainik Gomantak
गोवा

'PM किसान अंतर्गत मिळालेले पैसे परत करा', गोव्यातील 3,000 शेतकऱ्यांना झटका

गोव्यातील जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा फायदा होत आहे.

Pramod Yadav

PM Kisan Samnan Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दर वर्षी देशातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रूपये दिले जातात. मात्र, गोव्यातील तीन हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असून, त्यांना या योजनेअंतर्गत मिळालेले सहा हजार रूपये परत करण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोव्यातील तीन हजार शेतकरी आयकर आणि जमीन संबधित कागदपत्रांच्या नोंदी नसल्याकारणांना अपात्र ठरले आहेत. कृषी संचलनालयाने या शेतकऱ्यांना मिळालेले पैसे परत करण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने तीन हफ्त्यात दोन हजार रूपये असे एकून सहा हजार रूपये दिले जातात.

मात्र, परत करताना ही रक्कम एकरकमी परत करण्याची सूचना करण्यात आली आहे. शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत असताना अशा प्रकारची सूचना आणखी अडचणी वाढवणारी असल्याचे मत राज्यातील शेतकरी वर्गाने व्यक्त केले आहे.

गोव्यातील जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा फायदा होत आहे. दरम्यान, अशाप्रकारे पैसे परत करण्यास सांगितल्याने विविध आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. तसेच, पैसे जमा करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या पात्रतेची खातरजमा करायला हवी होती असेही काही शेतकरी म्हणत आहेत. शेतकऱ्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

तीन हजारपैकी 1,000 शेतकरी आयकर आणि उरलेले दोन हजार जमीन हक्क प्रकरणी अपात्र ठरले आहेत. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, योजनेचे पैसे परत करण्यास सांगितल्याने राज्यातील हे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

Goa Politics: खरी कुजबुज; ...काँग्रेस उत्‍पलसोबत राहणार?

Mormugao Port Coal Pollution: कोळसा हाताळणीविरोधात एकमत; मुरगाव पालिकेत ठराव मंजूर, ठोस कृती आराखड्याचा आग्रह

SCROLL FOR NEXT