Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express मुळे एका नव्या क्रांतीला सुरूवात - राणे

कुंभारखण-पिसुर्ले येथे ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Vande Bharat Express पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज दि. 27 जूनपासून देशात सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत’ रेल्‍वेमुळे एका नव्या क्रांतीची सुरूवात झाली आहे. पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ असलेल्‍या या रेल्‍वेमुळे दळणवळण व्यवस्थेत फार मोठी मजल गाठता येणार आहे.

दुरदृष्‍टी असलेल्‍या या नेत्‍याचे हात आणखी बळकट करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य‌‌‌ करून मेरा बूथ ‘सबसे मजबूत’ बनविला पाहिजे, असे उद्‌गार पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काढले.

पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील कुंभारखण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्‍हर्च्युअल पद्धतीने केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर राणे बोलत होत्‍या.

यावेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, भाजप संघटक विनोद शिंदे, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, केरी सरपंच दीक्षा गावस यांच्यासह विविध पंचायतींचे उपसरपंच, पंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे आचरण करताना व पक्षकार्य करताना देशसेवा प्रथम हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे. त्यामुळे पक्षकार्य वाढण्यास आपोआप मदत होईल.

पर्ये मतदारसंघातील सर्व बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ केला पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य दिले जाणार आहे, असेही डॉ. दिव्‍या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT