Canacona municipal market Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिका मार्केट भोवती दुर्गंधीचे साम्राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; विक्रीसाठीचा भाजीपाला ठरु शकतो अपायकारक

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण पालिकेच्या भाजी मार्केट सभोवती कचरा साचला असून गटारातील कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथील कचऱ्यावर गुरे ताव मारताना दिसत आहेत. याचा परिणाम या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो तसेच. विक्रीसाठीचा भाजीपाला अपायकारक ठरु शकतो. त्यामूळे पालिकेने याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक आहे. (The stench reigns around the canacona municipal market )

पालिककडे कचरा उचल करण्यासाठी स्वच्छता कामगार आहेत. शिवाय कचरावाहू वाहनेही आहेत. मात्र, भाजी मार्केटमधील कचऱ्याची उचल होत नाही. अनेक वर्षाचा प्लास्टिक व अन्य कचरा शेजारच्या शेतामध्ये साचला आहे. खुल्या मार्केटमधून वाहणाऱ्या दोन गटारांमध्ये प्लास्टिक व अन्य कचरा कुजून मासळी व चिकन-मटन मार्केटमधील पाणी साचले आहे. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामुळे ही गटारे तुंबली आहेत.

ही गटारे पालिकेने स्वच्छ करावीत, अशी मागणी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी केली असून ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका वर्षाकाठी किमान 81 लाख रुपये घरोघर कचरा उचल करण्यासाठी कंत्राटदाराला देते. मात्र पालिका मार्केट कचरामुक्त करण्यास दिरंगाई करते, अशी खंत नाईक गावकर यांनी व्यकत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT