The girls ran away due to the fear of their parents
The girls ran away due to the fear of their parents Dainik Gomantak
गोवा

आई-बाबा ओरडतील म्हणून मुली गेल्या पळून! गोव्याकडे येत असताना... पुढे काय झालं एकदा वाचाच

दैनिक गोमन्तक

अनेकदा अशा काही घटना असतात ज्यामुळे हृदयाचा थरकाप तर उडतोच, पण या घटना नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काशिमिरा येथील नगरपालिकेच्या बागेत खेळत असलेल्या 3 मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्या. मात्र पोलिसांच्या सहा तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर त्यांना शोधण्यात यश आले. पण या मुली अशा अचानक गायब का झाल्या? वाचा हे सविस्तर प्रकरण.

मुली बागेत खेळायला गेल्या होत्या आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परतणार होत्या. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्या परत न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला, त्यानंतर काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

हे होते गायब होण्यामागील कारण

उशिरा बाहेर राहिल्याबद्दल आई-बाबा फटकारतील, आपल्याला ओरडतील या भीतीने मुली घरी जायच्या ऐवजी पळून गेल्या असल्याचे पोलिसांना नंतर कळले. पालकांच्या तक्रारीनंतर अपहरण (मुली 11, 13 आणि 14 वर्षे वयोगटातील अल्पवयीन असल्याने) कलम 363 अन्वये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण किंवा मानवी तस्करी या भीतीपोटी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुलींचा माग काढायला सुरुवात केली.

मुंबई पोलिसांनी मुलींची अशी सुटका केली

पोलिसांनी तिन्हीही मुलींची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यात प्रसारित केली आणि व्हॉट्सअॅपसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पोस्ट केली. मात्र पोलिसांकडे फक्त एकच सुगावा होता तो म्हणजे एका मुलीकडे असलेला मोबाईल, जो तिने सोबत नेला होता.

या मुली दादर, कल्याणमार्गे ठाणे रेल्वे स्थानकावर आल्याचे तपासात समोर आले असून त्या गोव्याकडे जात असल्याचे सांगण्यात आले. बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाबाबत पोलिसांना खात्री नसल्याने त्यांनी पाळत ठेवली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी सांगितले की, "आम्ही तो मोबाईल फोन कधी सुरु होतोय याची वाट बघत होतो, शेवटी नंबर सक्रिय झाला. आम्ही त्याचा मागोवा घेणे सुरू केले आणि त्या पनवेलहून रत्नागिरीकडे जात असल्याचे आढळले. आम्ही रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकांशी जुळवून घेणे सुरू केले आणि त्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये असल्याचे आम्हाला समजले."

पालकांच्या रोषाला घाबरून मुली पळून गेल्या

पोलीस पथकाने त्यांच्या खेड सहकाऱ्यांशी संपर्क साधून मुलींचे फोटो दिले. खेड पोलिसांनी मुलींना शोधून सुरक्षितपणे काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही बालकल्याण समितीशी संपर्क साधला आहे आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलींचा ताबा त्यांच्या पालकांना दिला जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT