Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश; 23 वर्षीय आरोपीला अटक

आरोपीला वास्को पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथून अटक केली असून, गुन्हा केल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी येथील 14 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी वास्को पोलिसांनी महम्मद जाफर कादरी (23) या मूळ उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली आहे. आरोपीला वास्को पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथून अटक केली असून, गुन्हा केल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहीतीनुसार, ३० मे रोजी अल्पवयीन मुलगी गायब असून तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस संशयिताच्या मागावर होते.पोलिसांना संशयित मुंबईत असल्याची माहिती मिळाली. दाबोळी येथे राहणारा महम्मद जाफर कादरी (मूळ उत्तरप्रदेश) हा तरुण तिला घेऊन नवी मुंबई असल्याचे समोर आले.

त्यानुसार वास्को पोलिसांचे पथक नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. स्थानिक पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर, हेडकॉन्स्टेबल संतोष भाटकर यांच्या मदतीने वास्को पोलिसांनी महम्मदचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला गोव्यात आणून कुटूंबाच्या ताब्यात दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT