अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे; युवा समितीकडून स्पष्टीकरण Dainik Gomantak
गोवा

अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे; युवा समितीकडून स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आप सत्तेवर आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. त्यांची ही घोषणा समाजाची मते मिळवून फायदा घेण्यासाठी ती असू शकते.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष भंडारी समाजाच्या नेत्यांना अधिकाधिक उमेदवारी देईल त्या पक्षाला समाजाचा पाठिंबा असेल असे विधान समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केले होते ते समाजाच्या हितासाठी होते. त्या विधानाचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हता. कोणत्याही नेत्याने समाजाच्या समितीशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली तर समाज राजकीय पक्षांना पाठिंबा देतो असे होत नाही, असे स्पष्टीकरण समाजाच्या युवा समितीने केले.

पणजीतील समाजाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे अध्यक्ष सुप्रज तारी यांनी सांगितले की, समाजाचे नेते व माजी मंत्री महादेव नाईक यांनी ‘आप’चे मुख्यमंत्री समाजाच्या कार्यकारी समितीला भेटण्यास उत्सुक असल्याचे कळविले त्यानुसार या समाजाच्या अध्यक्षांनी त्याला होकार कळविला होता. त्यानंतर आपचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आप सत्तेवर आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. त्यांची ही घोषणा समाजाची मते मिळवून फायदा घेण्यासाठी ती असू शकते. त्यांनी केलेली ती घोषणा हे त्यांचे वैयक्तिक विचार असून त्यावर समाज बंधन घालू शकत नाही.

विचार मांडण्याचा अधिकार

गोमंतक भंडारी समाज विकासात मागे राहिला आहे. त्यासाठी जर या समाजासाठी काही राजकीय पक्षाचे नेते या समाजाच्या समस्या तसेच प्रश्‍न ऐकून ते सोडवण्यास पुढे येत असल्यास व त्यांच्या जाहीरनाम्यात या समाजासाठी विविध योजना आखणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. जर हे राजकीय पक्ष समाजाला गृहित धरून स्वतःची मते वाढवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा समाज ते बंद करू शकत नाही. राजकीय पक्षांना विचार मांडण्याचा घटनेत अधिकार आहे, असे तारी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT