Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

Amarnath Panjikar: स्मार्ट सिटी बनली ‘मिशन टोटल कमिशन’- काँग्रेस

स्मार्ट सिटीची कामे अकल्पनीय ठरली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City: पणजी ‘स्मार्ट सिटी’ची कामे निकृष्ट असून सल्लागाराला दिलेले ८ कोटी रुपये वाया गेल्याचे मत पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केल्याने राजधानीचे ‘डर्ट सिटी’मध्ये रुपांतर झाल्याचे उघड झाले आहे.

त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसने यापूर्वी केलेल्या ‘मिशन टोटल कमिशन’ या घोषणेला पुष्‍टी मिळत आहे, असा टोला प्रदेश काँग्रेसचे मींडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला.

बाबूश यांनी दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेला 70 कोटींचा सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंता भरती घोटाळ्याचा परिणाम म्हणून सदर पदे रद्द करणे भाजप सरकारला भाग पडले होते.

तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पावसकर यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली होती. आता बाबूश यांनी केलेल्‍या वक्तव्यामुळे नगरविकासमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनाही बिस्तर गुंडाळायला भाग पडेल, असे पणजीकर म्‍हणाले.

स्मार्ट सिटीची कामे अकल्पनीय ठरली आहेत. निदर्शनांनंतरही मंत्री राणे यांनी मौन बाळगले आहे. ते भाजपच्या ‘मिशन टोटल कमिशन’चा भाग आहेत आणि त्यामुळेच कामाची पाहणी करून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा आरोप पणजीकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT