Goa Sarpanch warns Government: Dainik Gomantak
गोवा

Goa Sarpanch: किनारपट्टी भागातील वीज पुरवठा सुरळीत करा, नाहीतर...

सरपंचांनी एकत्रित येऊन दिला इशारा; दक्षिण गोव्याला सावत्र वागणूक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Sarpanch warns Government: दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात विजेचा लपंडाव ही नित्याची गोष्ट बनली असून या संबंधी वारंवार तक्रारी करुन सुद्धा त्याची कोण दाखल घेत नाही, अशी तक्रार या भागातील सरपंचांनी एकत्र येऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वीज खात्याचा कारभार सुधारला नाही तर लोक रस्त्यावर येतील असाइशारा केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी दिली.

कारमोणा, ओर्ली, वार्का आणि केळशी पंचायत सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या 2 महिन्यांपासून वीज पुरवठ्यातील चढउतारामुळे किनारपट्टी भागातील गावांना येणाऱ्या समस्यांची माहिती दिली, जर उन्हाळ्यात ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात काय होईल असा सवाल वाझ यांनी यावेळी केला.

या उन्हाळ्यात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल त्यांचे म्हणणे आहे की मुख्य पुरवठा लाईन बंद आहे हे कारण असू शकत नाही.

प्रत्येक वेळी वीज विभागाने लवकरात लवकर समस्या सोडवावी आता आमचे रुग्ण संपले आहेत आम्ही विभागाने सोडवा अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ असा इशारा देत सरकार दक्षिण गोव्याला सावत्र आईसारखी वागणूक देत आहे अशी खंत त्यानी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला वार्काच्या सरपंच सेलू फर्नांडीस, ओर्लीचे सरपंच सायमन परेरा तसेच अन्य पंच सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT