Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘आरजी’चे समर्थन

मनोज परब यांची घोषणा; भ्रष्टाचार संपवण्यासाठी थोपटले दंड

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील पंचायत निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे कार्यकर्ते उतरणार असून त्यांना पक्षाकडून समर्थन दिले जाणार आहे. पंचायत स्तरावरील भ्रष्टाचार संपवण्यासाठी उमेदवार उतरवण्याचे ठरविले आहे. पंचायतीत लोकांची असलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना व्हावीत, हा उद्देश असल्याचे मत पक्षप्रमुख मनोज परब यांनी पणजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पक्षाचे अनेक कार्यकर्ते पंचायत निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना पक्षाचा पाठिंबा दिला जाईल. या पक्षाचा उद्देश पंचायत स्तरावरील विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा आहे. सरकारने या निवडणुकीत ओबीसी आरक्षणात गोलमाल केले आहे. मर्जीनुसार त्यांनी हे आरक्षण केले आहे. मतदारांचा हक्क चिरडला जात आहे, असा आरोप परब यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्‍वेश नाईक आणि रोहन कळंगुटकर उपस्थित होते.

राज्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीयांची संख्या वाढत असल्याने या पंचायती त्यांच्या हातात जाऊ लागल्या आहेत. दिवसेंदिवस प्रशासन पद्धत भ्रष्टाचार होऊ लागली आहे. मतदारांनाच त्यांच्या कामासाठी या पंचायत सदस्यांना लाच द्यावी लागत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी आरजीपीने शिक्षित तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरवून समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायतीवर निवडून आलेले पंचसदस्य सरकारची पोपटपंची करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

Goa Liquor Smuggling: महसूल बुडवला, बनावट बिलं बनवली! 1 कोटींच्या बनावट दारु तस्करीचा मास्टरमाइंड जेरबंद; सांगलीच्या शैलेश जाधवला अटक

Goa Water Issue: पर्यटन नगरीत जलसंकटाची चाहूल; राज्यातील 59% जलस्रोत प्रदूषित तर 39 तलाव 'सर्वात खराब' श्रेणीत

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT