Tillari Dam News google image
गोवा

बार्देश तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी; पाणी जपून वापरा, पुढील काही दिवस मर्यादीत पुरवठा

तिळारी धरणातून अस्नोडा आणि पर्वरी पाणी प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे.

Pramod Yadav

बार्देश तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी असून, पुढील काही दिवस संपूर्ण तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काही दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या वतीने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तिळारी धरणातून अस्नोडा आणि पर्वरी पाणी प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. यामुळे सोमवारपासून (13 नोव्हेंबर) संपूर्ण तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे.

पाणी पुरवठा सुरळीत होण्याची तारीख विभागाने सांगितली नसून, प्रक्रिया केंद्रात येणारे पाणी पूर्व पदावर आल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असे या पत्रकात म्हटले आहे.

तसेच, तालुक्यात विविध ठिकाणी पाणी सोडण्याच्या वेळेत देखील बदल होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया केंद्रात शिल्लक असलेल्या पाणी साठ्यावर वेळेत बदल केला जाईल, खात्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT