CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak | Goa News Update |Corona Update
गोवा

गोव्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीने सर्व व्यवहार शंभर टक्के सुरू करण्याची शिफारस केली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी कृती दलाची बैठक होण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे 3 मार्चला सर्व व्यवहार शंभर टक्के सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (Goa CM Pramod Sawant News Updates)

तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार कोरोना नियंत्रणात असल्याने चित्रपटगृहे, कसिनो, स्पा, जलतरण तलाव तसेच आयएसएल गेम्स यासाठी 100 टक्के उपस्थितीला परवानगी देणे शक्य आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर कृती दलाची बैठक झाली नाही. कोरोनाचा धोका नसल्याने या दलाच्या बैठकीशिवाय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर निर्णय घेणे शक्य असल्यास तो घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना (Covid 19) लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या शंभर टक्क्यांवर गेली आहे. नव्याने रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण घटले आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूपच खाली आले आहे. त्यामुळे राज्यातले सर्व व्यवहार शंभर टक्के क्षमतेने सुरू करावेत, असे तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. शाळा, (School) जीम, स्वीमिंग पूल, स्पा, थिएटर्स शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास अडचण नसल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT