Konkani Literature Festival Dainik Gomantak
गोवा

Konkani Literature Festival : 22 व्या कोकणी युवा साहित्य संमेलनाचे रेहमान अब्बास उद्घाटक

नरेश नाईक यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव बार्देस येथे होणाऱ्या 22 व्या कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नामांकित उर्दु आणि इंग्रजी भाषेतील साहित्यीक रेहमान अब्बास यांच्या हस्ते होणार असून यावेळी गोवा विद्यापीठात कोकणी अध्यापन करणारे युवा साहित्यिक नरेश नाईक यांचा 'युवा साहित्यिक' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

दोन दिवसांच्या या संमेलनाचे आयोजन गोवा कोकणी अकादमी आणि डीएमसी महाविद्यालय आसगाव यांनी केले असून 17 मार्च रोजी त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या संमेलन स्थळाला दिवंगत ज्येष्ठ कोकणी कवी नागेश करमली यांचे नाव देण्यात आले आहे.

रेहमान अब्बास हे रत्नागिरी येथे जन्म घेतलेले साहित्यीक असून त्यांच्या 'रोहझिन' या उर्दू कादंबरीला 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. या पुस्तकाचे जर्मन, इंग्लिश आणि हिंदी भाषेत अनुवाद झाला आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी मार्कुस गोन्साल्विस यांची निवड करण्यात आली असून डीएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर हे स्वागताध्यक्ष तर प्रा. पुरुषोत्तम वेर्लेकर हे कार्याध्यक्ष आहेत.

या संमेलन स्थळाच्या मुख्य मंडपाला दिवंगत कोकणी कार्यकर्ते नारायण मावजो यांचे नाव दिले असून अन्य दालनाना स्व. एडवर्ड डीलिमा, स्व. प्रकाश पाडगावकर, स्व. जयमाला दणायत, स्व. रजनी भेंब्रे आणि स्व. रेवणसिद्ध नाईक यांची नावे देण्यात आली आहेत. या संमेलनात ज्येष्ट साहित्यीक दत्ता दामोदर नायक आणि नूतन साखरदांडे यांची नरेश नाईक हे मुलाखत घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Defamation Case: कॅप्टन कूल कोर्टात 'टॉस' हरला? 100 कोटींच्या मानहानी प्रकरणात 10 लाख भरण्याचे आदेश

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ बंद होणार? खासदार फर्नांडिस यांच्या दाव्यानं खळबळ, युरी-सरदेसाई आक्रमक; जनआंदोलनाचा दिला इशारा

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

SCROLL FOR NEXT