Goa News Creamy layer  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘क्रिमीलेयर’बाबत तोडगा काढणार; उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांचे आश्‍‍वासन

Goa News: दोन दिवसांत समाजकल्याण खाते, ओबीसी आयोग व सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: क्रिमीलेयर ओबीसी घोळावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत समाजकल्याण खाते ओबीसी आयोग व सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍‍वासन उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.‌

ओबीसी दाखल्यासाठी पालकांचे वेतन विचारात घेऊ नये असे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना काही तालुक्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांनी पालकांचे वेतन जमेस धरून विद्यार्थी क्रिमीलेयरात येत असल्याचा दाखला दिला आहे.

पेडणे व बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून हा दाखला दिला आहे. त्यामुळे व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे‌ नुकसान होण्याची भीती व्यक्त करून या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्याची विनंती करणारे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

दरम्‍यान, येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्‍‍वासन श्रीमती गीते यांनी दिले. या शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक, अॅड. पराग वेळुसकर, गुरुदास सावळ व प्रमोद कारापूरकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT