Goa BJP Politics Dainik Gomantak
गोवा

"हवसे, नवसे, गवसे यांना भाजप पुरून उरेल'

दैनिक गोमन्तक

गोमंतकीय जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे संघटन हे भाजपचे बळ आहे. या बळावरच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळेल. राज्यात कितीही विरोधक आले तरी गोमंतकीय त्यांना धूळ चारतील, असा विश्वास भाजपच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख संदेश साधले यांनी व्यक्त केला.

श्री साधले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, निवडणूक म्हणजे एखादी जत्रा नव्हे की हवसे, नवसे आणि गवसे यांनी यावे. कोणी कितीही ताकदीने या निवडणुकीत उभा राहिला म्हणून भाजपला फरक पडत नाही. कारण गेली 3 दशके भाजप आणि आमचे संघटन लोकांच्या सेवेत आहे. भाजपची पाळेमुळे इथल्या मातीत आणि इथल्या लोकांमध्ये रुजली आहेत. केवळ स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकीपूर्वी 3-4 महिने येथे येऊन कोणी निवडणूक जिंकू शकत नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.

भाजप हा एक विचार आहे, संस्कृती आहे. भाजप केवळ आणि केवळ लोककल्याणासाठी वावरणारा पक्ष आहे. आमच्याकडे स्वार्थाला स्थान नाही. पण राज्यात सध्या पावसाळ्यात उगवणाऱ्या अळंबी प्रमाणे नी निवडणुका येताच अनेक पक्ष उगवत आहेत. पण या स्वार्थी लोकांना गोमंतकीय जनता चांगलीच ओळखून आहे, असे श्री साधले यांनी म्हटले आहे. दिल्लीतील एक पक्ष निवडणुकीची हौस भागवण्यासाठी देशभर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रातील एक पक्ष काही तरी गावते हे शोधण्यासाठी येतो. आता पश्चिम बंगाल मधील एक पक्ष नवसे म्हणून येत आहे. काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते आणि इतर काही जण त्यांच्या गळाला लागल्याने त्यांना आत्तापासूनच विजयाचा उन्माद चढल्याचे दिसत आहे, अशा शब्दात श्री साधले यांनी टीका केली आहे.

2012 पासून राज्यात भाजपची सत्ता आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत अतिशय चांगले काम करत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, पक्षाचे ज्येष्ठ आणि नवीन पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, पक्षाचा महिला मोर्चा, युवक मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा आदींनी कोरोना काळात उत्कृष्ठ काम केले. या कामाची पोचपावती गोमंतकीय जनता भाजपला नक्कीच देईल, असा विश्वास श्री साधले यांनी व्यक्त केला.

कोरोना काळात सरकारने आणि भाजपच्या संघटनेने सर्वसामान्य लोकांसाठी खूप काही केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करून लोकांना दिलासा दिला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गोमंतकीय जनतेचे अश्रू पुसण्यासाठी भाजपचे सरकार पुढे होते. त्यावेळी हे असले नौटंकी बाज पक्ष आणि नेते कुठे होते, असा सवाल श्री साधले यांनी केला.

राज्य सरकारने आता पर्यटन खुले केले आहे. आगामी काळात सर्व सोपस्कार पूर्ण करून राज्यातील खाण व्यवसाय सुद्धा सुरू होईल. आणि राज्याचे अर्थचक्र पुन्हा वेगाने सुरू होईल. या सर्व गोष्टींची माहिती गोमंतकीय नागरिकांना आहे. यामुळे ते स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सर्व पक्ष आणि नेते संधीसाधू आहेत. भाजप पक्ष अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा खोटा प्रचार करत निवडणुकीत येत आहेत. प्रत्यक्षात अल्पसंख्याक समाजाला वस्तुस्थिती माहीत आहे. त्यामळे ते ही भाजपच्या पाठीशी उभे असल्याचे श्री साधले यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT