Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: काजळी नदीला पूर! मुंबई-गोवा महामार्ग बंद; पर्यायी मार्ग कोणता?

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे.

Pramod Yadav

रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीवर पूल फार जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला असून, नदी भरभरुन वाहतेय.

काजळी नदी लांजा तालुक्यातून वाहत जाणारी ही नदी रत्नागिरीतून पुढे अरबी समुद्राला मिळते. गुरूवारी दुपारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अंजनारी पूलाच्या येथे थांबवण्यात आली आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

कोणता पर्यायी मार्ग वापरता येईल?

मुंबई - गोवा महामार्ग बंद करण्यात आल्याने रत्नागिरीला जाणारी वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पावस मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग खुला केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल’च्या तारखा जाहिर! गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन; देशभरातून विविध संत-महंत होणार दाखल

Rivona Temple Theft: गोव्यात आणखी एका मंदिरात दिवसाढवळ्या चोरी! केवण-रिवण येथील देवीच्या अंगावरील दागिने पळवले

Bondvol Lake: बोंडवेल तलावाला संरक्षण कवच! 200 मीटरमध्ये बांधकामास परवानगी नाही; मंत्री राणेंचे स्पष्ट निर्देश

Panaji Municipal Election: भाजप पॅनलचे 50% नवे चेहरे! दामू नाईकांचे स्पष्टीकरण; यादी निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू

Suryakumar Yadav: 'शून्य'वर अभिषेक आऊट झाला आणि..! कॅप्टन सूर्याने सांगितले टीमच्या यशाचे गुपित; ईशान किशनबाबत म्हणाला की..

SCROLL FOR NEXT