Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: काजळी नदीला पूर! मुंबई-गोवा महामार्ग बंद; पर्यायी मार्ग कोणता?

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे.

Pramod Yadav

रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीवर पूल फार जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला असून, नदी भरभरुन वाहतेय.

काजळी नदी लांजा तालुक्यातून वाहत जाणारी ही नदी रत्नागिरीतून पुढे अरबी समुद्राला मिळते. गुरूवारी दुपारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अंजनारी पूलाच्या येथे थांबवण्यात आली आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

कोणता पर्यायी मार्ग वापरता येईल?

मुंबई - गोवा महामार्ग बंद करण्यात आल्याने रत्नागिरीला जाणारी वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पावस मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग खुला केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT