Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

आमदार दिलायला लोबो: उशिराच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला अपयश

प्रदेश महिला काँग्रेसतर्फे पणजीत सत्कार

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणुकीत उमेदवारांचे नाव किमान तीन महिने अगोदर जाहीर होण्याची गरज आहे. काँग्रेसने उमेदवारांची नावे उशिरा जाहीर केल्याने त्यांना प्रचार करण्यास वेळ कमी मिळाला त्याचा परिणाम काही उमेदवार काही मतफरकाने पराभूत झाले, असे मत आमदार दिलायला लोबो यांनी या सत्कारावेळी बोलताना व्यक्त केले. शिवोलीतून निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार दिलायला लोबो यांचा आज काँग्रेस प्रदेश महिला मोर्चातर्फे पणजीतील काँग्रेस मुख्यालयात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष बीना नाईक, डॉ. प्रमोद साळगावकर तसेच मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीत केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे त्या निवडून आल्या. निवडणुकीची तयारीही त्यांनी सर्वांच्या आधीच सुरू केली होती. त्याचा लाभ त्यांना झाला. त्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तेच ध्येय ठेवून कामाला लागावे,असे मत व्यासपीठावरील वक्त्यांनी व्यक्त केले.

आमदार लोबो म्हणाल्या की, गोमंतकीयांना भाजप सरकार पुन्हा सत्तेत नको, असे वाटत होते. या निवडणुकीत 66 टक्के मतदारांनी भाजपविरोधी मतदान केले. मात्र, ही मते विभागणीचा लाभ भाजपला झाला. भाजपविरोधी मतदारांची मने वळवण्यात काँग्रेसला अपयश आले,असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT