MLA Michael Lobo on Coastal Area Waste Management Dainik Gomantak
गोवा

किनारी पट्ट्यात कचऱ्याची समस्या वाढतीये; मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: मायकल लोबो

राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय आहे.

Kavya Powar

Coastal Area Waste Management: राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय आहे.

प्रामुख्याने किनारी पट्ट्यात कचऱ्याचा प्रश्न गहन बनला आहे. याबाबत माजी कचरामंत्री व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पूर्वीप्रमाणे कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित होत नसून विभागप्रमुख व कचरा मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्यात कचरा गोळा करणारे लोक बाहेरचे असतात. ते खरे तर कचरा व्यवस्थापनाचे आणि स्वच्छतेचे दूत आहेत. हे काम कोणी गोवेकर करेल का? काही राजकीय पक्ष आहेत जे त्यांना बाहेरील म्हणत हाकलून देऊ इच्छितात. काही लोक त्यांचा गैरवापर करतात. ते चांगले काम करतात. आपण त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे, असे परखड बोल लोबोंनी व्यक्त केले.

पुढे म्हणाले की, रस्त्याच्या कडेला आणि राज्यात जवळपास सर्वत्र कचरा टाकला जातो. पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कचरा दिसतो. लवकरात लवकर मंत्री आणि विभागप्रमुखांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT