mauvin godinho In valpoi  Dainik Gomantak
गोवा

Prashasan Tumchya Daari : सरकार नव्या ‘ई-बस’ खरेदी करणार : माविन गुदिन्हो

वाळपईत ‘प्रशासन तुमच्या दारी’मध्ये ग्वाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

ग्रामीण भागात लोकांना वाहतुकीची उत्तम सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक खात्याचा नवीन पाचशे ई-बसेस खरेदीचा प्रस्ताव ठेवणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीत अडीचशे बसेस देण्याचे निश्चित झाले असून पुढील महिन्यात शंभर बसेस राज्याला मिळतील, अशी ग्वाही वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशासन तुमच्या दारी उपक्रमात ते बोलत होते. मंत्री गुदिन्हो यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

तीस दिवसांत फाईल मार्गी लागेल !

पंचायतीत एखादी फाईल दिल्यानंतर ती पूर्णत्वास येण्यास बराच अवधी जातो. म्हणूनच आता नवीन नियम लागू करून तीस दिवसात फाईल मार्गी लागेल, तशी तरतूद केली जाणार आहे. पंचायत व गटविकास अधिकारी यांच्या संयोजनातून तीस तीस दिवसांत कामांची कार्यवाही होणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

"सत्तरीच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने योग्य व्यक्तीची नेमणूक केली आहे. सत्तरीत यापूर्वी मंत्री काब्राल ‘प्रशासन तुमच्या दारी’ उपक्रमात सामील झाले होते. आज गुदिन्हो यांनी समस्या सोडवण्याबाबत दिलेला प्रतिसाद चांगला आहे."

-डाॅ.दिव्या राणे,आमदार पर्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

SCROLL FOR NEXT