loss to Cashew Plant due to untimely rain Dainik Gomantak
गोवा

अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागांचं नुकसान

हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त गोवेकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला असला तरीही अचानक आलेल्या पावसाने काजू, आंबा, फणस यासारख्या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे.

अवकाळी पावसामुळे काजू (Cashews) आणि आंब्याचं पीक उशिराने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणा पावसासह वादळी वाऱ्याने मोहोर झडून गेल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. चांगला मोहोर येऊनही निसर्गाच्या लहरीपणामुळे फळधारणा नीट होत नसल्याचं चित्र गोव्यात दिसू लागलं आहे.

सासष्टी (Salcete) आणि मुरगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागायतींचं मोठं नुकसान झालं आहे. गोव्यात मार्चमध्ये तब्बल 37 अंशांपर्यंत तापमान पाहायला मिळालं होतं. तर फेब्रुवारीमध्ये हेच तापमान जवळपास 35 अंश होतं. हंगामी पिकांसाठी पोषक वातावरण असूनही केवळ अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. कोरोनाचे (Corona) निर्बंध आता कुठे हटवले जात असतानाच नव्या संकटामुळे शेतकरीही हतबल झाल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT