Konkan Railway Update Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: बेलापूर, रत्नागिरी, मडगाव नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार; कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज

Konkan Railway Monsoon Update: रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी 672 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway

कोकण रेल्वेने पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांची तयारी केलीय. यात मार्गावरील देखभाल, अतिरिक्त सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांवरती विशेष लक्ष देण्यात आले आहे.

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू झाले असून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.

बदलणाऱ्या हवामानासोबत मार्गावरील ट्रेन्सचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्नशील आहे. पावसाळ्यात अखंडित सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोकण रेल्वेने पावसाळ्यात रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी 672 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर वेग निर्बंध लादलेल्या असुरक्षित मार्गांवर चोवीस तास गस्त घातली जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर वेग निर्बंध लादले जातात. प्रतिकूल हवामानामुळे घडणाऱ्या नैसर्गिक घटना विचारात घेता कोकण रेल्वे सुरक्षात्मक उपाययोजना करत असते. कॅसल रॉक परिसर असेल किंवा घाट मार्गात होणाऱ्या घटनांमुळे बऱ्याचवेळा रेल्वे गाड्या रद्द होणे अथवा विलंबाने थावतात. यासाठी कोकण रेल्वेकडून खबरदारी घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT