रामनगर : सध्या सर्वत्र भात कापणीचा हंगाम सुरू असल्याने हत्तीचे वेगवेगळे कळप जोयडा तसेच खानापूर तालुक्यातील शेतांमध्ये घुसून पिकांचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे. या हत्तींच्या बंदोबस्तासाठी काही शेतकऱ्यांनी शेताभोवती तारांची संरक्षक कुंपणे उभारली आहेत.
रविवारी सकाळी खानापूर तालुक्यातील शिवठाणनजीकच्या सुलेगाली येथील गणपती गुरव यांच्या शेतात घुसलेल्या दोन नर जातीच्या हत्तींना झटका मशीनचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. येथील झटका मशीनच्या तारेवर वीज विभागाची मुख्य वाहिनी पडल्याने हत्तींच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
तसा बनावही करण्यात आला होता; परंतु संपूर्ण शहानिशा केल्यानंतर गणपती गुरव या शेतकऱ्यानेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी झटका मशीन तारेला थेट वीज विभागाची विद्युतवाहिनी जोडल्यामुळे या दोन हत्तींचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी पंचनामा केला.
अलीकडेच खानापूर हद्दीजवळ हत्तींचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. अशा अमानवी कृत्यामुळे हत्तींचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.