Goa Stampede Dainik Gomantak
गोवा

Goa Stampede: शिस्त नसेल तर चेंगराचेंगरी होणे ठरलेलेच असते! माजी अग्निशमन अधिकाऱ्यांनी सक्षम यंत्रणेचे सांगितले महत्व

Lairai Jatra Stampede: खरेतर अग्निशमन दलाच्या संपर्कात कोणी आले तरी दलाला एकावेळी अग्निशमन आणि आणीबाणीच्या घटना सांभाळताना यावर लक्ष द्यावे लागते.

Sameer Panditrao

डिचोली: गर्दीचे ठिकाण मग ते कोणतेही असो तेथे जमाव हाताळणारी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असते. त्यावेळी भक्त व इतर लोक असा भेदभाव करता येत नाही. जमावाला शिस्त घालता येत नसेल तर चेंगराचेंगरी होणे हे ठरून गेलेलेच असते, असे माजी अग्निशमन अधिकारी गोपाळ भिसो शेट्ये यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. त्यांना अग्निशमन दलात काम करण्याचा ४० वर्षांचा अनुभव आहे, विशेष म्हणजे शिरगावलगतच्या डिचोली येथेही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

शिरगाव जत्रेतील दुर्घटनेप्रमाणे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मुख्यत: कोणकोणत्या सुरक्षाविषयक उपाययोजना आवश्यक असतात?

फक्त शिरगाव जत्रोत्सवच नव्हे तर गोव्यातील भाविकांची गर्दी बघता गावागावांत भरणाऱ्या जत्रांबरोबरच जांबावली गुलाल, फातर्पे जत्रा (सलग ९ दिवस), चंद्रनाथ जत्रोत्सव पारोडा-केपे अशा प्रमुख व नावाजलेल्या उत्सवात अग्निसुरक्षेबरोबरच दुकानांचे, भाविकांचे (गर्दी) व्यवस्थापन या‌ गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्यात तात्पुरता वीजपुरवठा, स्वयंपाक गॅस हे प्रमुख विषय असतात. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी पुरेशी रंगीत तालीम घेणे आवश्यक असते, त्यातून त्रुटी दिसू शकतात.

अशा मोठ्या सार्वजनिक समारंभांदरम्यान अग्निशमन दलाची भूमिका काय असते आणि ती कशी अधिक परिणामकारक करता येईल?

अग्निशमन दलाची भूमिका समन्वयाची असते. अग्निसुरक्षेचे उपाय‌ सुचवले तरी दल दबाव टाकू‌ शकत नाही. तरी‌ आपत्कालीन व्यवस्थापन, पोलिस आणि इतर घटकांनीही यावर लक्ष देणे तितकेच गरजेचे असते. कारण व्यक्ती सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे असते.

आपत्कालीन परिस्थितीत जमाव नियंत्रित करण्यासाठी कोणती पूर्वतयारी किंवा प्रशिक्षण महत्त्वाचे असते?

खरेतर प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक असावेत जे आपत्कालीन परिस्थितीत दलाला उपयुक्त ठरतील; पण याबाबतीत मात्र अंधार आहे. कारण साधारण २०१२ मध्ये दलाने काही ग्रामीण तालुके (पेडणे, डिचोली, सत्तरी) लक्षात घेऊन दलाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते; पण प्रतिसाद निराशाजनक होता.

सुरक्षा यंत्रणांकडून अशा कार्यक्रमांपूर्वी कोणत्या प्रकारचे ‘रिस्क असेसमेंट’ किंवा धोक्याचे मूल्यांकन केले पाहिजे?

खरेतर अग्निशमन दलाच्या संपर्कात कोणी आले तरी दलाला एकावेळी अग्निशमन आणि आणीबाणीच्या घटना सांभाळताना यावर लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अधिकारी आणि जवान, यंत्रसामग्री यावर बंधने येतात. वाईटातील वाईट स्थिती काय असू शकते याचा अंदाज अंमलबजावणी यंत्रणेला असणे आवश्यकच असतो. त्यानुसार धोका टाळण्यासाठी पावले टाकणे ठरवता येते.

Lairai Jatra Stampede

स्थानिक प्रशासन, पोलिस, स्वयंसेवक आणि अग्निशमन विभाग यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील?

‌वरील सगळ्या यंत्रणा एकत्र बैठकीत आल्या तरी अग्निशमन दलाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, यावर बैठकीतील ज्येष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत, असा माझा अनुभव आहे. कित्येक वेळा प्रत्यक्ष दुर्घटनेवेळीही मदतीवर लक्ष केंद्रित करून या लोकांची मनधरणी करावी लागते. त्याचबरोबर आवश्यक मदत जमवताना तुम्ही इथे फोन करायला आलात की मदत करायला, अशी बोलणी खावी लागतात. पण आशुतोष आपटे, नीना नाईक गोलतेकर, दशरथ रेडकर, सुधीर केरकर, कै. सुदिन नातू हे अधिकारी म्हणजे आपत्काळात अगदी तरबेजपणे सहकार्य करतात, असा अनुभव आहे.

आपल्या अनुभवातून अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वतःसाठी कोणती काळजी घ्यायला हवी?

अशा गर्दीच्या ठिकाणी आपापली जबाबदारी घेत, हजर असलेल्या पोलिस यंत्रणेची मदत घेत, त्यांच्या सूचनांचे पालन करत (वाहने चालवताना आणि वाहनतळावर योग्य ठिकाणी लावताना) इतरांना आपल्यापासून तसदी पडणार नाही याचे भान ठेवले तरी कोणताही कार्यक्रम यशस्वी होतोच.

अप्रिय घटना टाळण्यासाठी काय करावे?

वार्षिक कार्यक्रमकर्त्यांनी महिनाभर अगोदर संबंधित यंत्रणेला कळवून प्रत्येकाकडून आलेल्या सुरक्षाविषयक सूचनांवर काम करावे. आठवडाभर आधी सुरक्षा सूचनांवर किती अंमलबजावणी झाली याचा लेखाजोखा सादर करावा. शिवाय येणाऱ्या भाविक जनतेला वारंवार सहकार्याचे आवाहन करत आपापले कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता पार पाडावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT